Wednesday, August 4, 2010

A cup of coffee...

"अ कप ऑफ कॉफी" म्हणजे नक्की काय ???  खरच सुचत नाही मला काय काय लिहायच ते.. हो पण एक गोष्ट मात्र नक्की की मे इथे कुठल्याच प्रकारची कॉफीची recipe पोस्ट नाही करणार आहे.. :)

अ कप ऑफ कॉफी म्हटल की एका कप मध्ये चॉकलेटी रंगाचा थोडस कडवट पेय वरती क्रीम ने आयसिंग करून आपल्या समोर ठेवल आहे, फक्त एवढच आठवत का??  की मग त्याच सोबत मनात खेळ मांडतात ही वाक्य "ए चल ना कुठेतरी निवांत बसून गप्पा मारू" , "मला तुझशी थोडस बोलायच आहे, कॉफी शॉप मध्ये जाउयात??" , "ए आज lecture नको कंटाळा आलाय, चल ccd मध्ये जाउ..."
ही सगळी वाक्य कशी मनात मोरासारखी थुई थुई नाचू लागतात..

कॉफीच्या ह्या छोट्याशा कप बरोबर आपल्या आयुष्यातील कितीतरी सुंदर क्षण जोडलेले आहेत.. कॉफी म्हटल की आठवतात त्या ccd मधल्या तास-तास रंगलेल्या गप्पा, barista मध्ये एक मेकांची केलेली टिंगल, रिलॅक्स मधल्या खलबती, एक मेकांशी मारलेल्या मनसोक्त गप्पा, मित्रांना सांगितलेल मना-मधल गोड गुपीत, रात्र रात्र केलेला अभ्यास...


कस त्याला M3 चा पेपर अवघड गेला होता तेव्हा चेंज म्हणून ccd मध्ये गेलो आणि नुसत्या गप्पा हाणल्या, ऐन परीक्षेचा काळात.. चेंज वगैरे बाजूलाच पण क्रिटिकल पर्यंत M3 ने काही त्याची साथ सोडली नव्हती..
कॉलेज dinner फालतू होता, हे तर फक्त निंमिता होत रात्री ११ वाजता ccd मध्ये जाउन टाइमपास करण्याच..
कॉफी चा चवी पेक्षा आजही जिभेवर रेंगळते ती ह्या आठवणींची चव..

पण आजचा आपल्या ह्या आयुष्यात आपले हे सुंदर क्षण भूर उडून गेले आहेत.
आज वन बाय टू कॉफी शेअर करायला कोणी नाहीए. निवांत गप्पानसाठी कोणा जवळच वेळ नाहीये.. आपल आयुष्या बांधल गेलय त्या घड्याळाचा काट्या मध्ये. आपण ही पळत असतो त्या सेकण्ड काट्या सारखे आपल्या रोजचा जीवनात... ह्या टिक टिक टिक टिक पळणार्‍या काट्या ने आपल्या कडून बर्‍याच गोष्टी हेरावून घेतल्या आहेत.



आज देखील तेच ccd, तीच कॉफी पण तिला त्या गप्पांची सर नाही.. घशातून खाली उतरते फक्त एक कडवट चॉकलेटी द्रव्य...
पण मला ह्या टिक टिक आयुष्यातून बाहेर पडायचाय आणि माझा कॉफीचा कप परत मिळवायचाय.. खर तर तो कायम आपल्या जवळच असतो, फक्त आपण आपल्या routine मध्ये इतके busy झालोत की आपण नकळत मनाचा एका कप्प्यात हा कप ठेवून दिला आहे..

तेवढा फक्त बाहेर काढायचाय... हरवलेले क्षण परत मिळवायचे आहेत.. :)

Monday, August 2, 2010

असतात काही नाती अशीच.......

आपण रोज कित्तेक लोकांना भेटतो, त्यांचाशी बोलतो. काही आपले मित्र असतात काही colleagues तर काही अगदीच अनोळखी नवीन चेहरे. सगळेच काही आपल्या मनावर त्यांचा ठसा उमटवत नाहीत. तरीही ह्या सगळ्यांशी एक नात जोडल जात..


काही लोकांना वारंवार भेटून तर काही लोकांची एखादी गोष्टा आवडते म्हणून ते मित्र असतात किवा स्नेही किवा आजचा भाषेत म्हणायचा झाल तर "aquaintances"..

पण काही नाती अशी असतात जी अचानक आयुष्यात येतात आणि आयुष्य बनतात..
असच काहीतरी झाल आहे....


कधी कधी एखादी व्यक्ती किती पटकन आपल्या आयुष्यात येते, म्हणजे काही कळायचा आत ती व्यक्ती आपल्याला आपली वाटू लागते... कधी मनाचे बंध जूळतात हे कळतच नाही... ही व्यक्ती आपल्या आयुष्यातील एक अविभज्या घटक होऊन जाते..

पण ही व्यक्ती आपली मैत्रीण नसते, मित्र नसतो, प्रियकर, प्रेयसी काही काहीच नसते, पण तरी ती आपलीच असते आणि खूप खूप जवळची वाटते... ते एक वेगळाच नात असत.. ह्या अशा नात्याना नावच नसत.. त्या व्यक्ती चा नुसता फोन किवा एसएमएस आला तरी मन हुरळून जात..

आपण त्यांना रोज भेटत नाही किवा रोज फोन वर गप्पा देखील मारत नाही, पण तरीही "आज भेटायच का" अस म्हटल्यावर आपण कितीही busy असलो तरी एका क्षणाचाही विलमभ न करता आपण पटकन "हो" म्हणतो.. तेव्हा आपण आपल schedule कधीच check करत नाही.. आणि गंमत म्हणजे भेटिचा reminder लावायची देखील गरज पडत नाही...:) इथे इगो वगैरे काही नसत.. अगदी spiritual भाषेत बोलायचा झाल तर "self-less"....


भेटायच पण नुसती भेट म्हणून त्यात कसलच गणित नसत, नफा किवा तोटा नसतो देवाण घेवाण नसते.. काहीच मागायचा नसत आणि काहीच द्यायच नसत.. मिळवायचा असतो तो केवळ एकमेकांचा सहवास.. - काही क्षणांचा का होईना....

आजचा जगात अशा भेटी म्हणजे अगदीच दुर्मीळ...पण भेटल्यावर भर भरून गप्पा मारायचा असतात, एकमेकन निरखून पाहायचा असत.. आणि वेळ संपत आली की परत शून्य... दोन तास गप्पा मारल्यावर सुद्धा अस वाटत, अरे खूप बोलायच राहून गेल.. अजुन मला बराच काही सांगायच होत..

ह्या अशा काही व्यक्ती मनात घर करून बसतात ते तिथून कधीच ना जाण्यासाठी... ते आपले असतात आणि नसतात पण..

ह्याला मित्र म्हणाव प्रियकर म्हणाव philosopher की guide म्हणाव, हा एक खूप मोठा प्रश्न मनात तांडव मांडत असतो..


कधी वाटत काय म्हणत असतील अशा नात्यांना.. कधी वाटत नकोच काही म्हणयला.. ही नाती आपल्या पुर्तीच असतात नकोच जागा पुढे मांडायला.. तसही लोकांना अशी नाती मुळी कळतच नाहीत... असु द्याव हे फक्ता दोघांपुरती.. दोघाननीच ठरवाव.. तसच चालू द्यावा सगळा प्रवास...

राहू द्यावीत ही नाती निनावी - पण ज्याची फक्त त्या दोघाननाच ओळख आहे, दोघांपुरतीच सीमीत .

असतात काही नाती अशीच - न समजणारी न उमगणारी आपल्या पुर्तीच आणि आपलीच....